‘शिस्त म्हणजे दबाव किंवा नियंत्रण नव्हे’, ‘तरुण मन ताजं असतं. काळाची बाधा त्याला होत नाही’, ‘नातं म्हणजे जीवन आहे’, ‘भय आणि सुख या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भयरहित व्हायचं असेल, तर सुखावेगळं व्हावं लागेल’, ‘आपण आणि ही निरर्थकता वेगळी नाही. मी आणि ‘कुणी नाहीची पोकळी’ एकत्र आहे’, जे. कृष्णमूर्ती यांची ही वचने आणि या वचनांचा अर्थ, विश्लेषणाचा या पुस्तकात समावेश आहे.
कृष्णमूर्ती यांची काही वचने निवडून हेमकिरण पत्की यांनी हे लेखन केले आहे. ही वचने म्हणजे जीवन जगतानाचे मार्गदर्शक आहेत. जीवनाचे सार आहेत. ‘मनाचं रिकामं असणं, अनुभवापासून मोकळं हे ध्यान आहे’, ‘जाणीव कितीही परिपक्व असली, तरी तिला एक मर्यादा असते’, ‘सुंदरता मानवनिर्मित माध्यमांच्या पलीकडे आहे’, अशी वाक्ये अंतर्मुख करणारी आहेत.
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन
पाने : १७५
किंमत : २०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)